Tuesday 5 September 2017

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान नऊ जण बुडाले

गणेश विसर्जनाच्या मिरवणुका राज्याच्या विविध भागांत शिगेला पोहोचल्या असतानाच नदी, तलावांमध्ये बुडून वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.
मरण पावलेले बहुतांश वयाच्या विशीच्या आतील आहेत. नदीत, तलावात, बंधाऱयात पाण्याचा अंदाज न आल्याने या तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात शाळकरी मुलगा बंधाऱयाच्या गाळाचा अंदाज न आल्याने पाण्यात फसला आणि बुडून मरण पावला. अशीच घटना बीड जिल्ह्यातही घडली आहे. बंधाऱयातील गाळात रुतत गेल्याने माजलगाव (जि. बीड) येथे मुलगा बुडून मरण पावला.
पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमधील जगताप डेअरीजवळ संध्याकाळी दोनजण बुडाल्याचे वृत्त आहे. महापालिकेने नदीकाठावर दक्षता पथके नियुक्त केली आहेत. ही पथके बुडालेल्या दोघा तरूणांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याविषयी काहीही समजलेले नाही.
सातारा जिल्ह्यातील कुडाळ (ता. जावळी) गणपती विसर्जन करताना हेमंत वाघ (वय 18) या तरूणाचा बुडुन मृत्यू झाला आहे. नाशिकमधील नाशिकरोड येथे किशोर कैलास सोनार लोळगे (वय 20) याचा गणपती विसर्जन करताना नदीत बूडन मृत्यू झाला आहे.
सर्वात मोठी दुर्घटना औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन येथे घडली. तेथे शिवणी तळ्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला.
मृतांमधे सागर सुरेश तेलभाते (वय १३)  आदित्य ताराचंद किर्तिशाही (वय १२) आणि राजेश सुनील गायकवाड (वय १२) यांचा समावेश आहे. अर्जुन सुभाष पोपळघट (वय १२) याचे प्राण वाचले. सर्व मृतदेह औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवि

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...