Wednesday 13 September 2017

उजनी धरणातून भीमा नदीत तीस हजाराचा विसर्ग वाढवण्यास सुरुवात

उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे यामुळे उजनी धरणातून यावर्षी सलग तिसऱ्यांदा पाणी भीमा नदीपात्रात सोडण्याची वेळ आलेली आहे. दौंड येथून उजनी धरणामध्ये येणारा विसर्ग जरी कमी असला तरीही उजनी धरणाच्या  क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून या वर्षी दोन वेळा पाणी भीमा नदीपात्रात सोडण्याची वेळ आलेली आहे.
उजनी धरणाच्या क्षेत्रात मागील आठवड्यापासून चालू असलेल्या पावसामुळे पाणी सोडण्यात येत आहे. आज दुपारी १२ वाजे पर्यंत  उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडला जाणारा पाण्याचा विसर्ग  ५ हजार क्युसेक्‍स एवढा होता. यामध्ये दुपारी १२ वाजता वाढ करून तो १५ हजार क्युसेक्‍स एवढा करण्यात आला, तर आज दुपारी २.३० वा यामध्ये वाढ करून तो ३० हजार क्युसेस एवढा करण्यात आलेला आहे.
उजनी अपडेट 
दि.१३ सप्टेंबर२०१७ ,  दुपारी.४ वा.  पाणी पातळी :  ४९७.२७५ मी.
एकूण साठा  :  ३४७२.०४ द.ल.घ.मी. 
उपयुक्त साठा : १६६९.२३ द.ल.घ.मी. टक्केवारी :  ११०. ०२%. 
मुख्य कालवा : २००० क्युसेक्‍स.
बोगदा  : ६०० क्युसेस.
वीज निर्मिती : १५०० क्युसेक्‍स.
भिमा नदी सांडवा : ३००००क्युसेक्‍स

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...