Tuesday 19 December 2017

वंचिताना न्याय देण्यासाठी एकत्र यावे : स्वाती मोराळे

● वंचितांना न्याय देण्यासाठी एकत्र यावे:स्वाती मोराळे यांचे ओबीसी बांधवांना आवाहन ●
नांदेड,दि.२०(प्रतिनिधी):- वंचित घटकाला नेहमीच विकासापासून डावलले जात असून त्यांच्यावर अन्याय होत आहे तो अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्यासाठी ओबीसी बांधवांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे असे आवाहन ओबीसी फाऊंडेशन इंडिया च्या संस्थापिका व राष्ट्रीय अध्यक्षा सौ.स्वातीताई मोराळे यांनी नांदेड दौर्या दरम्यान रेणुका माता माहूरगड येथे  कार्यक्रमाप्रसंगी बोलताना सांगितले.तर निलय नाईक यांनी ओबीसी समाज ने एकत्र येण्याचे आव्हान केले. मी सतत स्वातीताई यांच्या पाठीशी उभा आहे. एक महिला एवढी पुढे येऊन काम करत आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे असेही ते म्हणाले.माहूर गडाचा ही आणखी विकास करू असे माहुरच्या सभापती यांनी सांगितले.या कर्यक्रमास  यवतमाळ चे ओबीसी फौंडेशन चे अध्यक्ष गणपतराव पोतगंटवार,नांदेडचे अमित साळवी, माहूर गडचे अशोक पोलगांटीवर ,माहूर चे सभापती व मराठवाडा विभाग प्रमुख लक्ष्मण लटपटे, लातूर महिला अध्यक्ष
 गयादेवी सिरसाट, नांदेडच्या सुनंदा फड संतोष साळवी, गजानन गोरे श्याम खांडरे ही उपस्थित होते. तसेच त्यांच्यासोबत ओबीसी फाऊंडेशन इंडिया चे राष्ट्रीय सचिव मा.रत्नाकर मोराळे,मा.सुदर्शन सानप,तसेच मा.वसंतराव नाईक (माजी मुख्यमंत्री) यांचे नातू मा.निलय नाईक यांच्या कुटुंबास पुसद जि.यवतमाळ येथे मोराळे यांनी भेट दिली.

No comments:

Post a Comment

सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...