एक महिन्यांपूर्वी खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण केला. आलेला निधी खर्च केला; परंतु, खड्डे मात्र जैसे थे आहेत. . शहरी भागातील नागरिकांबरोबरच ग्रामस्थही खड्ड्यांमुळे जेरीस आले आहेत. एकाही गावाला जाण्यासाठी चांगला रस्ता नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तरीही प्रशासन गप्प आहेशहरातील विविध भागातील खड्डेयुक्त रस्त्यांमुळे वाहन चालकांची दमछाक होत आहे. संत सावतामाळी चौक ते वळण रस्त्यापर्यंत असलेल्या रस्त्यावर ठिक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालक त्रस्त आहेत. याशिवाय तालुक्यातील मानोली गावाला जाणाऱ्या रस्त्यावर एवढे खड्डे झालेत की, रस्ता नेमका कुठे आहे? हेच समजत नाही. वर्षानूवर्षापासूनची ही स्थिती असून, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस दुरवस्थेत भर पडत आहे. परिणामी ग्रामस्थ त्रस्त झाले आहेतपरभणी ते फाळेगाव या राज्य रस्त्यावर मुख्य बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे झाले आहेत. अनेक दिवसांपासून ही परिस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने ढुंकूनही पाहिले नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने रस्त्याच्या दुरवस्थेत भर पडली आहे. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारक, पादचाऱ्यांना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या खड्ड्यांची दुरुस्ती करावी,नुसार बहुतांश रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे कामही पूर्ण करण्यात आले; परंतु, कामाचा दर्जा समाधानकारक राहिला नसल्याने खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर आता जैसे थे स्थिती पहावयास मिळत आहे. परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम विशिष्ट कंत्राटदारांनाच देण्यात आले आहे. त्यामुळे केलेल्या कामांची पडताळणी काटेकोरपणे केली गेली नाही.कामाचा दर्जा समाधानकारक राहिला नसल्याने खड्डे बुजविलेल्या रस्त्यांवर आता जैसे थे स्थिती पहावयास मिळत आहे़ परिणामी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत़ विशेष म्हणजे खड्डे बुजविण्याचे काम विशिष्ट कंत्राटदारांनाच देण्यात आले आहे़ त्यामुळे केलेल्या कामांची पडताळणी काटेकोरपणे केली गेली नाही़ आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत़ त्यामुळे ज्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम संबंधित कंत्राटदाराला दिले होते़, त्या कंत्राटदाराने सदरील काम केले किंवा नाही? याबाबतही आता ठामपणे सांगता येत नाही़ परिणामी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी केलेला जवळपास २५ कोटी रुपयांचा खर्च वाया गेला आहे़
Subscribe to:
Post Comments (Atom)
सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड
पटवर्धन कुरोली,ता.०३: उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली . येथील मा...
-
पटवर्धन कुरोली, ता. २८: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथे ग्रामीण कृषी जागरूकता कार्यक्रम २०२१-२२ चे आयोजन करण्यात आले होते. ...
-
मोहन कोळी-पटवर्धन कुरोली पटवर्धन कुरोली, ता. २७: पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील पटवर्धन कुरोली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद...
No comments:
Post a Comment