पाणीपुरवठा योजनेच काम निकृष्ठ.
पटवर्धन कुरोली - पटवर्धनकुरोली ता पंढरपूर येथील दलित वस्ती मध्ये सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
पटवर्धनकुरोली येथील दलित वस्ती मध्ये पाणी पुरवठा योजनेच काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षांपासून दलित वस्तीमध्ये पाण्याची सोय नव्हती. ग्रामपंचायत व जिल्हापरिषद प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देताच पाणी पुरवठा योजनेच काम सुरू झाले. मात्र ते ही निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. .
पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य कमी प्रतीच वापरून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. या योजनेच्या पाईपलाईन दोनफुट खोल चारीतून घेणे बंधनकारक आसताना ती चारी अर्धा फूट ही खोल घेतली जात नाही, ग्रामपंचायतीची विकास कामे विद्यमान पदाधिकारीच करीत असल्याने कामाचा दर्जा घसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पंचायत समिती प्रशासनाने या सर्व कामाची चैकशी करावी, बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रिपाई चे लक्ष्मण डावरे, नामदेव डावरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदव्दारे दिला आहे
चॊकट--
या बाबत आपण स्वता कामाची पाहणी करू, या योजनेचे काम स्वता ग्रामपंचायत करत आहे बिलं आजून काढलेली नाहीत कुणाच्या तक्रारी असतील तर त्यांच्या समक्ष त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू
- सुधीर गोरे
शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग पंढरपूर
पटवर्धन कुरोली - पटवर्धनकुरोली ता पंढरपूर येथील दलित वस्ती मध्ये सुरू असलेले पाणी पुरवठा योजनेचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून ठेकेदारावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
पटवर्धनकुरोली येथील दलित वस्ती मध्ये पाणी पुरवठा योजनेच काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या वर्षांपासून दलित वस्तीमध्ये पाण्याची सोय नव्हती. ग्रामपंचायत व जिल्हापरिषद प्रशासन दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा देताच पाणी पुरवठा योजनेच काम सुरू झाले. मात्र ते ही निकृष्ठ दर्जाचे होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. .
पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येत असलेले साहित्य कमी प्रतीच वापरून नागरिकांची दिशाभूल सुरू आहे. या योजनेच्या पाईपलाईन दोनफुट खोल चारीतून घेणे बंधनकारक आसताना ती चारी अर्धा फूट ही खोल घेतली जात नाही, ग्रामपंचायतीची विकास कामे विद्यमान पदाधिकारीच करीत असल्याने कामाचा दर्जा घसरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
पंचायत समिती प्रशासनाने या सर्व कामाची चैकशी करावी, बोगस काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अन्यथा 26 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा रिपाई चे लक्ष्मण डावरे, नामदेव डावरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदव्दारे दिला आहे
चॊकट--
या बाबत आपण स्वता कामाची पाहणी करू, या योजनेचे काम स्वता ग्रामपंचायत करत आहे बिलं आजून काढलेली नाहीत कुणाच्या तक्रारी असतील तर त्यांच्या समक्ष त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू
- सुधीर गोरे
शाखा अभियंता पाणीपुरवठा विभाग पंढरपूर
No comments:
Post a Comment