Wednesday 29 May 2019


पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर)  येथील माजी सरपंच महादेव उपासे यांच्या निधनानंतर  तिसऱ्याच दिवशी भावकीचे सुतक फेडुन मराठा समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे.

अंत्यसंस्कारानंतर भावकीतील लोकांना दहा दिवस सुतक पाळावे लागते. यामुळे भावकीतील लोकांना दहा दिवस  गावातील किंवा पाहुणे मंडळींच्या शुभ कार्यात सहभागी होता येत नाही, सण समारंभ साजरे करता येत नाही. मराठा समाजातच फक्त एवढे जादा दिवस सुतक पाळले जाते. त्यामुळे भावकीतील लोकांना दहा दिवस  विनाकारण त्रास सोसावा लागतो

 पटवर्धन कुरोली येथे लोकसंख्येच्या चाळीस टक्के उपासेची भावकी आहे.  भावकीतील लोकांना  गावातील व पाहुणे मंडळींच्या शुभ कार्यात सहभागी होता यावे, सण समारंभ साजरे करता यावेत यासाठी उपासे कुटूंबियांनी  तिसऱ्याच दिवशी भावकीचे सुतक संपविण्याचा  निर्णय  घेतला. तसा निर्णय सर्व भावकीतील लोकांना कळवला. 

या कृतीचा सर्व मराठा समाज बांधवांनी आदर्श घ्यावा व  जुन्या रूढी व परंपरा यांना फाटा देऊन, भविष्याचा वेध  घेत आदर्श पद्धतीचा जीवनात अवलंब करावा व मराठा समाजाची प्रगती साधावी. प्रत्येक आत्मा हा पवित्रच आहे मग निधनानंतर त्याच्यासाठी सुतक का पाळायचे ? अशा भावना व्यक्त केल्या.त्यांच्या या कृतीचे सर्व नातेवाईकांनी कॊतुक करून मराठा समाजातील प्रत्येकाने जा आदर्श घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत  अनेक वेळा मराठा समाजातील सुधारणावाद्यांनी सुतक तीन दिवसात सम्पवणे,  या नुसार हा महत्वाचा  व इतरांना अनुकरणीय निर्णय घेतल्याने याचे समाजातून स्वागत होत आहे,


Tuesday 28 May 2019

पटवर्धन कुरोली, ता.वृक्षारोपण ही काळाची गरज असून केवळ वृक्षलागवड न करता त्याचे संगोपनाची जबाबदारी हि महत्त्वाची असल्याचे चिंचणी (ता.पंढरपूर)  येथील ग्रामस्थानी लोकसहभागातुन दाखवून दिले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही गाव हिरवाइने नटले असुन. झाडांमुळे पक्षांची किलबिलाट मोठ्या प्रमाणात चालू आहे.

चिंचणी (ता.पंढरपूर) पुनर्वसीत गाव. सातारा जिल्ह्यातील कन्हेर प्रकल्पा मुळे हे गाव पंढरपूर  तालुक्यातील पिराची कुरोली या गावाजवळ पुनर्वसित करण्यात आले. गावची लोकसंख्या जेमतेम साडेतीनशे. गाव जरी लहान असले लोकसंख्या जरी कमी असली तरी लोकसहभागातुन सर्व काही शक्य असल्याचे गावाने दाखवून दिले आहे.

दहा वर्षापूर्वी सोलापूर जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडला होता. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा हाणी होत असल्याने दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे येथील ग्रामस्थाना जाणवले. त्यावेळी त्यानी गावात झाडे लावण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थानी गावात अतिशय नियोजन पद्धतीने तीन हजारावर झाडे लावली. गावात रस्त्याच्या दुतर्फा, स्मशानभूमीत,  शाळेच्या आवारात, मंदिर परिसरात तसेच गावातील मोकळ्या जागेत हे वृक्षारोपण केले.

यावेळी त्यानी फुलाच्या झाडासह नारळ, चिंच, पेरु, चिक्कू, आवळा, अंजीर, जांभुळ, सीताफळ या सारखया उत्पादन देणार्या फळांच्या झाडांसह ऒषधी गुणधर्म असणार्या तुळस, अडुळसा या सारख्या वनस्पतींची लागवड करण्यात आली. ग्रामस्थानी लोकसंख्येच्या दहापट झाडे लावली. पण दुष्काळात आव्हान होते ते झाडे जगविण्याचे.  यावेळी ग्रामस्थानी प्रत्येक रोपाला पाणी कसे मिळेल अशी व्यवस्था केली हि झाडे जोपासण्यासाठी ग्रामस्थानी लोकवर्गणीतुन विंधन विहीर घेतली. आणि प्रत्येक झाडाला ठिबक केले. त्यामुळे पाणी टंचाईच्या काळातही झाडे झोपासली.  त्यानंतर आलेल्या दुष्काळातही ग्रामस्थानी विविध पध्दतीने  झाडे जगविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. झाडांना अळी बनविणे, गवत कापणे हि कामे ग्रामस्थ श्रमदानातुन करतात. गावात शेळया,जनावरे आहेत तरीही सर्व झाडे विना ट्री गार्ड ची आहेत.  या वर्षी आणखी वेगवेगळ्या प्रकारची सोळाशे झाडे लावण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.

आज चिंचणी गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारची साडेचार हजार झाडे आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातहि या ठिकाणी संपूर्ण गाव हिरवेगार दिसत आहे. तसेच झाडामुळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांची किलबिलाट चालू आहे. पक्षांसाठी झाडावर पाण्यासाठि भांडी ठेवण्यात आली आहेत.तसेच पक्षांना आंघोळीकरीता झाडांच्या खाली पाणी भरून ठेवण्यात आली आहेत.


 सोलापूर जिल्हा हा कायम स्वरूपी कमी पाऊस पडणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो.पाऊस भरपूर पाडण्यासाठी पर्यावरण संतुलित राहणे गरजेचे आहे.   त्यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याची गरज असून चिंचणी सारख्या छोट्या गावाने जो आदर्श घालून दिला आहे. तो सर्वानी आत्मसात केल्यास पर्यावरण संतुलित राहिल. आणि दुष्काळी सोलापूरच्या बाबतीत वेगळे चित्र पाहावयास मिळेल हे नक्की.

***   दैनिक सकाळ तर्फे हरित वारि  हरित पालखी मार्गा अंतर्गत प्रत्येेक वर्षी पालखी मार्गावरील गावात वक्षारोपण करण्यात येते या गावामध्ये तिन वर्षापूर्वी या गावात गावाच्या या वाटचालीत हातभार म्हणून ''दैनिक सकाळ" ने हि  दहा झाडे लावली होती. तिही झाडे मोठ्या दिमतीने डॊलु लागलेत.

***चिंचणी गावाची कृषीपर्यटनाकडे वाटचाल करण्याचा ग्रामस्थांची संकल्पना असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. काहीही झाले तरी गाव कृषीपर्यटन करायचा असा चंग ग्रामस्थानी बांधला आहे.  अशा गावाना शासनाने कृषी पर्यटन करण्यासाठी या गावाना पाठबळ देण्याची गरज आहे.

 गावात फटाके बंदी आहे. झाडे जास्त असल्यामुळे पक्षांची संख्या भरपुर आहे हे पक्षी फटाक्याच्या आवाजाने बाहेर जाऊ नये म्हणुन गावात दिवाळी,यात्रा,लग्न,मध्ये फटाके वाजवले जात नाहीत.पक्षांसाठी झाडावर पाण्यासाठि भांडी ठेवण्यात आली आहेत.तसेच पक्षांना आंघोळीकरीता झाडांच्या खाली पाणी भरून ठेवण्यात आली आहेत.



सोनाली साखरे यांची सरपंचपदी निवड

 पटवर्धन कुरोली,ता.०३:  उजनी वसाहत (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनाली दादासाहेब साखरे यांंची बिनविरोध निवड झाली .  येथील मा...