पटवर्धन कुरोली, पटवर्धन कुरोली (ता.पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती येथे एसटी बस व झाडांना राख्या बांधून हा एक आगळावेगळा उपक्रम साजरा करून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला विद्यार्थिनींनी “रक्षाबंधन पर्यावरणाचे’ हा संदेश समाजाला दिला. श्रावण पौर्णिमेला प्रत्येक वर्षी रक्षाबंधन साजरा होतो. बहिणीने भावाला राखी बांधून आपले रक्षण करावे म्हणून ती भावाला ओवाळते याचा एवढाच अर्थ नसून आदर्श विद्यार्थिनींनी झाडाला राखी बांधून “आम्हा मानव प्राण्यांचे तू रक्षण कर’ असे झाडाला साकडे घालून मानवाला निरोगी आयुष्य मिळावे म्हणून पर्यावरणाचे रक्षण करावे, पर्यावरण ही काळाची गरज आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
शहरीकरणाप्रमाणे ग्रामीण भागात दिवसेंदिवस झाडे लावण्यापेक्षा वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आपोआपच प्रदूषणात वाढ होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे. पर्यावरणाचे महत्व सर्वांना कळावे आणि त्यातून समाजजागृती व्हावी, हा हेतूने. . कोणतेही आंदोलन, मोर्चा म्हटलं की लक्ष्य ठरते ती आपली सर्वांची लाडकी " लालपरी "एस टी या एस टी ला आपण जपले पाहिजे या हेतूने तिला विद्यार्थ्यांनी राखी बांधून आपण तिला जपू या असा संदेश दिला.तसे त्या एसटीत कर्तव्यार्थ असणारे चालक व वाहक यांना त्यांच्या कर्तव्यामुळे हा सण साजरा करता येत नाही म्हणून त्यांनाही राख्या बांधून एक वेगळा संदेश या कार्यक्रमातून दिला.
नवनवीन झाडे तर लावली जातातच, पण या झाडांचे रक्षण राखी बांधून आदर वस्ती शाळेच्या विद्यार्थिनींनी केले.
तसेच पर्यावरण संरक्षणाच्या हेतूने झाडालाही राख्या बांधून झाडे लावूया झाडे जगूया हा संदेश यातून दिला.यावेळी एसटीचे चालक श्री संतोष कांबळे व शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री बोबडे सर, हरिभाऊ कोळसे , मारुती कोळसे , अकबर आतार,भैरवनाथ गुंड , प्रकाश माने, नवाज आतार उपस्थित होते. सहशिक्षक श्री कैलास सोनवणे यांनी "रक्षाबंधन" याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली